`अनिरुद्ध पहाट-१६’ सद्‌गुरुकृपेने शिष्यास मात्र गुरुत्वच प्राप्त होते!

।। हरि ॐ।।

श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या दासबोध ग्रंथात सद्‌गुरुस्तवन करण्यात आलेले आहे. सद्‌गुरुस्तवन करताना श्रीसमर्थ रामदासस्वामी नेमकं काय म्हणतात? ते आपण कालपासून `अनिरुद्ध पहाट’मध्ये पाहत आहोत!

सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२॥

परीसस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की, ते परत लोखंड कधीच होत नाही. त्याप्रमाणे गुरूंनी आपल्या दासाचे अज्ञान एकदा समूळ नष्ट केले की, तो परत कधीही संशयात पडत नाही.

कां सरिता गंगेसी मिळाली । मिळणी होतां गंगा जाली ।
मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३॥

नदी एकदा गंगेस मिळाली की त्यासरशी ती गंगाच बनते. मग कितीही प्रयत्न केले तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकतच नाही.

परी ते सरिता मिळणीमागें । वाहाळ मानिजेत जगें ।
तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥ १४॥

एखाद्या ओहोळाला नदीला मिळण्यापूर्वी जग लहान ओढाच म्हणते. पण नदीला मिळाल्यावर तो नदी होतो. तसा सामान्य साधक सद्‌गुरुकृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्‌गुरुकृपा झाली की तो तत्काळ गुरूच होतो.

परीस आपणाऐसें करीना । सुवर्णें लोहो पालटेना ।
उपदेश करी बहुत जना । अंकित सद्गुरूचा ॥ १५॥

परीस लोखंडाचे सोने करतो पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण जो साधक सद्‌गुरूचा कृपांकित होतो, तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो.

शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णें सुवर्ण करितां न ये ।
म्हणौनी उपमा न साहे । सद्गु्रूसी परिसाची ॥ १६॥

परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही, पण सद्‌गुरुकृपेने शिष्यास मात्र गुरुत्वच प्राप्त होते; म्हणून सद्‌गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्य नाही.

उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतचि क्षार ।
अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७॥

बरे त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो तर अत्यंत खारट असतो म्हणून तीही उपमा योग्य नव्हे. अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पांती क्षीरसागरही नष्ट होतो. म्हणून तीही उपमा देता येत नाही.

उपमे द्यावा जरी मेरु । तरी तो जड पाषाण कठोरु ।
तैसा नव्हे कीं सद्गु रु । कोमळ दिनाचा ॥ १८॥

सद्‌गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर मेरुपर्वत जड पाषाणाचा व कठोर आणि सद्‌गुरू तर दीन शरणागताविषयी अत्यंत कोमल अंतःकरणाचे असतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. (१८)

उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण ।
या कारणें दृष्टांत हीण । सदद्‌गुरूस गगनाचा ॥ १९॥

बरे ! सद्‌गुरूंना गगनाची उपमा द्यावी, तर त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडचे निर्गुण आहे. म्हणून गगनाची उपमासुद्धा हीन ठरते. (१९)

धीरपणे उपमूं जगती । तरी हेहि खचेल कल्पांतीं ।
म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीण वसुंधरा ॥ २०॥

धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल. म्हणून तिची उपमाही अयोग्य ठरते. 

आता उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती ।
शास्त्रें मर्यादा बोलती । सद्गुचरु अमर्याद ॥ २१॥

सद्‌गुरू परम प्रकाशरूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहे. पण सद्‌गुरूचे सामर्थ्य अमर्याद आहे. ते नित्य परम प्रकाशरूपच आहेत.

म्हणौनी उपमे उणा दिनकर । सद्गुfरुज्ञानप्रकाश थोर ।
आता उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२॥

सदगुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणारा असल्याने त्याला सूर्याची उपमा देताच येत नाही. बरे शेषाची उपमा द्यावी तर त्याने स्वतःच पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे. परंतु श्रीगुरू शिष्याचा संसारभार दूर करतात. म्हणून तीही उपमा देता येत नाही.

-`स्टार वृत्त’ १५०५२०२५

 

अनिरुद्ध पहाट-१५ वाचण्यासाठी इथे क्लिक करा!

error: Content is protected !!