श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस – २१
*🌟श्रीगुरुचरणमासनिमित्त अनिरूद्धांचे गुणसंकीर्तन दिवस -२१🌟*
*🔆 भक्तिमय सेवा : भाग – ५🔆*
१.विद्या प्रकाश योजना
२. अन्नपूर्णा महाप्रसादम्
३. धांगडधिंगा शिबीर
*🕯️विद्या प्रकाश योजना🕯️*
🔅सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी २ ऑक्टोंबर २००२ साली तेरा कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. या तेरा कलमी कार्यक्रमातील चौथे कलम होते, *‘विद्या प्रकाश योजना’.*
🔅भारतात आजही असंख्य ग्रामीण भाग असे आहेत की तेथे वीज पोहोचलेली नाही आणि ज्या गावांमध्ये वीज पोहोचली आहे, त्यांना दिवसातील काही तासच वीज मिळते. दहा ते अठरा तासांचे भारनियमन होते. ग्रामीण क्षेत्रात बहुतांशी शाळा मध्यवर्ती गावात असतात आणि त्या शाळेत आजूबाजूच्या गावातून मुले येतात. बहुतांश भागात ही मुले पायीच मोठे अंतर कापतात. थकून भागून संध्याकाळी घरी आलेली मुले आपला आभ्यास करणार कधी? सूर्यास्तानंतर वीज नसेल तर मुलांना आपला अभ्यास करता येत नाही. यामुळे आपल्याकडे क्षमता असूनही अनेक मुले आपली शैक्षणिक प्रगती साधू शकत नाहीत. त्यांच्या शैक्षणिक विकासाला खीळ बसते. विद्याप्रकाश योजनेद्वारे अशाच *मुलांना काळोखात प्रकाश उपलब्ध करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळे दूर करण्याचा सद्गुरु श्रीअनिरुद्धांचा संकल्प आहे.*
🔅वीजेची उपलब्धता नसलेल्या भागातील विद्यार्थ्यांची अभ्यासाची, गृहपाठाची समस्या सोडविण्यासाठी विद्याप्रकाश योजनेअंतर्गत अशा ठिकाणी मेणबत्त्या आणि काडेपेटी यांचे वाटप केले जाते. या मेणबत्तीच्या प्रकाशात ही मुले अभ्यास करू शकतात. या विद्याप्रकाश योजनेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी विजेवर अवलंबून रहावे लागत नाही.
🔅या विद्याप्रकाश योजनेचे एक आध्यात्मिक महत्त्वही आहे. श्रीराम म्हणजेच सूर्य, आपल्या जीवनातील प्रकाश. जीवनातील सकारात्मकता म्हणजेच श्रीराम, जो आपल्याला जीवनातील नकारात्मकतेशी, अंधाराशी आणि सैतानाशी लढण्याची ताकद देतो. या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मेणबत्त्या भेट देणे म्हणजे *प्रकाशाचा आणि जीवनाचा मूळ स्रोत असणार्या श्रीरामाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करणे होय. या विद्यार्थ्यांना जीवनात विद्येचा प्रकाश आणल्याने श्रद्धावानांचे जीवनसुद्धा प्रकाशमान होते.*
🔅या विद्याप्रकाश योजनेसाठी अनेक श्रध्दावान *मेणबत्ती व काडेपेट्या* दान करतात. श्रीहरिगुरुग्राम अथवा श्रीअनिरुद्ध उपासना केंद्रांवर दान स्वीकारले जाते. अनेकजण तर आपल्या जीवनातील विशेष प्रसंगी उदाहरणार्थ वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या वेळेस मेणबत्ती व काडेपेट्यांचे दान करतात. श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन, अशा दान स्वरूपात आलेल्या या मेणबत्त्या आणि काडेपेट्यांचे दुर्गम गावातील गरजू विद्यार्थांना वाटप करते.
🔅या मेणबत्त्यांचे वाटप धुळे, नांदेड येथील गावांमध्ये होत होते. तसेच शहापूर व कोल्हापूर आणि विरार येथे होणार्या वैद्यकिय शिबिरातदेखील हे वाटप केले जाते. या मेणबत्त्यांचे वाटप विद्यार्थ्यांना वर्षभर करण्यात येते.
🔅ज्या भागातील गावांमध्ये विद्याप्रकाश योजनेअंतर्गत या वस्तूंचे वाटप करण्यात आले, तेथे विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटल्याचे लक्षात आले आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. विद्यार्थांची चांगली प्रगती घडून आलेली आहे. एक सक्षम व साक्षर भारत घडविण्यात विद्या प्रकाश योजना आपले छोटेसे योगदान देत आहे.
*🥘अन्नपूर्णा महाप्रसादम्🥗*
*‘अभिगम्योत्तमं दानम्|’*
🔅‘ज्याला गरज आहे त्याच्याकडे जाऊन केलेले दान हे सर्वोत्तम दान.’ – महर्षी पराशर.
*‘खरोखरच कित्येक वेळा काही जीव इतके दुर्बळ व असहाय्य स्थितीत असतात, की त्यांना सहाय्य घेण्यासाठी दात्याकडे जाण्याची शक्तीदेखील उरलेली नसते, एवढेच नव्हे तर दाता समोर आल्यावर त्याच्याकडे मागण्याचीदेखील ताकद उरलेली नसते, अशा वेळेस या जीवांना जे काही द्यायचे ते दात्याने स्वतःहून त्यांच्या स्थळी नेऊन द्यावे. कारण व्यक्तिगत व सामाजिक जीवनातील उणीवा दूर करणे हेच दानामागचे पवित्र तत्त्वज्ञान आहे.’* असे श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजच्या प्रथम खंडात सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंनी सांगितले आहे.
🔅आजही भारतात अशी कुटुंबे आहेत, ज्यांना दिवसभराच्या कष्टानंतरही एक वेळचे पोटभर अन्न मिळत नाही. जे आपली एकवेळची भूकदेखील नीट भागवू शकत नाहीत, अशी कुटुंबे आपल्या मुलांना शाळांमध्येतरी कशी पाठवतील? आणि जरी त्यांनी मुलांना शाळेत पाठवले, तर या मुलांकडून अभ्यास कसा होईल? या मुलांना चांगले आरोग्यही प्राप्त होऊ शकत नाही. यामुळे पिढीचा विकास खंडित होतो. जर या मुलांना उचित पौष्टिक आहार मिळाला तर ही मुले शाळेत येऊन अभ्यासही करतील आणि त्यांच्या प्रगतीची द्वारे खुली होतील. हा विचार करूनच २००७ मध्ये सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या मार्गदर्शनाखाली श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन आणि संलग्न संस्थांनी ’अन्नपूर्णा महाप्रसादम्’ ही योजना सुरू केली.
*🔆अन्नपूर्णा महाप्रसादम् म्हणजे काय ?*
🔅श्रद्धावान अन्नदान करून आपल्या सदगुरुप्रती प्रेम व्यक्त करतात आणि याच प्रेमाने, श्रद्धेने श्रद्धावान सेवक शाळेत स्वयंपाक करून या विद्यार्थ्यांना जेवायला वाढतात. त्यांच्या या निष्काम सेवा आणि भक्तीभावामुळे हे अन्न म्हणजे प्रसाद बनतो. त्यामुळेच सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंनी यास ‘प्रसादम्’ असे म्हटले आहे. अन्नाची पूर्ती आणि सगळ्यांचे पोषण करणार्या ‘देवी अन्नपूर्णे’च्या आशीर्वादामुळे हे कार्य संपन्न होते. यामुळे या योजनेला अन्नपूर्णा देवीचा ‘प्रसाद’ म्हणजेच ’अन्नपूर्णा महाप्रसादम्’ असे म्हटले आहे.
*🔆अन्नपूर्णा महाप्रसादम्ची संकल्पना –*
१. ह्या योजनेअंतर्गत श्रद्धावान धान्य, तेल आणि इतर आवश्यक गोष्टींचे दान करू शकतात.
२. दान केलेले सर्व धान्य आणि इतर सामग्री गरजू शाळांसाठी विविध ठिकाणी वितरीत केली जाते.
३. शाळांमध्ये श्रद्धावान सेवक स्वतः जाऊन दुपारचे जेवण शिजवतात आणि विद्यार्थ्यांना पोटभर अन्न खाऊ घालतात.
४. या योजनेमुळे दानासारखे पुण्यकर्म तर होतेच पण बरोबरच श्रमदान सेवेमुळे श्रद्धावानांना आपले वाईट प्रारब्ध नष्ट करण्यासाठी सदगुरुंचा आशीर्वादही प्राप्त होतो.
५. याचबरोबर चांगले शिक्षण प्राप्त करण्यासाठी जी शारीरिक ताकद आवश्यक असते ती या अन्नाद्वारे विद्यार्थ्यांना मिळते ज्यामुळे सक्षम भारत बनण्याच्या दिशेने आपण कूच करू शकतो.
*🔆अन्नपूर्णा महाप्रसादम्चा उद्देश –*
🔅शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना समतोल आणि पोषक आहार मिळावा आणि दुपारच्या जेवणाच्या ओढीने तरी पालकांनी त्यांच्या मुलांना दररोज शाळेत पाठवावे याच उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. ज्यामुळे भूक आणि शिक्षण या दोन्ही समस्यांचे निवारण होऊ शकेल.
*🔆वाटप आणि व्यवस्थापन –*
🔅‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’द्वारे धान्य, कडधान्य, तेल, मसाले अशा जिन्नसांचे दान अनिरुद्ध गुरुक्षेत्रम खार (पश्चिम), मुंबई येथे स्वीकारले जाते. तसेच हे दान फाऊंडेशनच्या विविध उपासना केंद्रातही स्विकारले जाते. दर गुरुवारी आपण श्री हरिगुरुग्राम, न्यू इंग्लिश स्कूल वांद्रे (पूर्व) मुंबई येथेही दान करू शकतो.
🔅दान केलेले सर्व धान्य मुंबई नजिकच्या विरार, ठाण्याच्या दुर्गम गावांमध्ये पाठविले जाते. त्या गावांमधील स्थानिक श्रद्धावान सेवक स्वतः दररोज स्वयंपाक करून या विद्यार्थ्यांना ताजे जेवण उपलब्ध करून त्यांना प्रेमाने जेवायला वाढतात. मुलांची जेवणे आटोपल्यानंतर स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून, भांडी घासून श्रद्धावान सेवक आपली त्या दिवसाची सेवा सद्गुरु चरणी अर्पण करतात.
*🔅सद्य परिस्थिती –*
🔅अन्नपूर्णा महाप्रसादम योजनेअंतर्गत *२० हून अधिक शाळांमध्ये* ‘श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन’ तर्फे सेवा दिली जाते. उदाहरणार्थ विद्या वैभव विद्यालय, केळवे रोड, या शाळेतील २५०-३०० विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. ही मुले आदिवासी कष्टकरी आणि इतर रोजंदारी कामगार वर्गातून आलेली असतात. विरार, सफाळे आणि मायखोप या उपासना केंद्रातील श्रद्धावान या सेवेत प्रेमाने सक्रिय असतात. दररोज या मुलांना दुपारचे जेवण दिले जाते, ज्यामध्ये वरण, भात आणि उसळ असते. यासाठी जी काही आवश्यक कामे असतात, ती सर्व हे श्रद्धावान करतात.
🔅ज्या शाळा दोन सत्रात कार्यरत असतात अशा शाळांसाठी श्रद्धावान ११:३० ते २:०० या वेळेत जेवण तयार करतात. ज्यामुळे दोन्ही सत्रांतील विद्यार्थ्यांना ताजे व गरम जेवण मिळते. आजमितीस श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशन व संलग्न संस्थांच्या ७००-८०० श्रद्धावानांनी ह्या सेवांमध्ये सहभाग घेतला. आपल्या व्यस्त दिनक्रमातूनही आपला व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून हे श्रद्धावान या सेवेसाठी प्रेमाने वेळ देतात.
*🔅कोल्हापूर वैद्यकीय आणि आरोग्य शिबीर –*
🔅कोल्हापूरच्या पेंडाखळे या गावात आयोजित केल्या जाणार्या शिबीरात दरवर्षी *१०० विविध शाळांतील ९००० हून अधिक विद्यार्थी* या योजनेचा लाभ घेतात. या शिबीरात अन्नपूर्णा महाप्रसादम्तर्फे दिल्या जाणार्या भोजनाचा आनंद ही मुले लुटतात आणि त्याच बरोबर आपले ताट, वाट्या स्वच्छ धुवूनदेखील ठेवतात. सर्वजण *’वदनी कवळ घेता…’* ही प्रार्थना म्हणूनच भोजनाला सुरुवात करतात. त्यामुळे परमेश्वराचे नामस्मरण करून त्यास धन्यवाद देऊन अन्नग्रहण करण्याचे संस्कारही नकळतपणे या मुलांवर होतात. म्हणूनच *अन्नपूर्णा महाप्रसादम्* ही योजना केवळ भूक भागविण्याची योजना नसून आपल्या देशाच्या भावी पिढीस मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक दृष्टीने सक्षम आणि उज्ज्वल बनवणारी महत्त्वपूर्ण योजना आहे.
*🔆👦धांगड धिंगा शिबीर👧🔆*
🔅श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनीच्या वतीने संस्था विविध कार्यक्रम आयोजित करते. त्यापैकी एक म्हणजे *‘धांगड धिंगा शिबीर’* जो केवळ मुलांसाठी घेण्यात येतो.
🔅आजच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात, भक्तीच्या मार्गावर निःस्वार्थ सेवेच्या मार्गावरुन एखादी व्यक्ती प्रगती करू शकते. हा दृष्टीकोन लक्षात घेऊन परमपूज्य सद्गुरु बापू, परमपूज्य नंदाई आणि परमपूज्य सुचितदादा यांनी सर्वांना प्रगतीकडे नेण्याचा मार्ग सुरू केला आहे. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी धांगड धिंगा शिबीर सुरू करण्यात आले.
🔅प्रत्येक व्यक्तीला जन्मापासूनच छुपे कौशल्य आणि कौशल्ये मिळाली आहेत आणि त्यांचे वैयक्तिक कौशल्य दर्शविण्याचा सर्वात योग्य काळ म्हणजे बालपण. आजकाल मुले दूरचित्रवाणी, व्हिडिओ गेम्स, चित्रपट इत्यादी गोष्टींकडे वाकून त्यांचा वेळ वाया घालवतात. शाळा, वर्ग, शिकवण्या इत्यादी दैनंदिन नियतकालिकातही ते बंधनकारक असतात, त्यामुळे त्यांची कौशल्ये आणि त्यांची कलागुणही अद्यापही सापडत नाही.
🔅नंदाई हा बाल विकास कार्यक्रम म्हणून गेल्या १२ वर्षांपासून चालवित आहेत ज्यात छुप्या गुणांचा शोध लावण्यात आला आहे. यामध्ये प्ले वे मार्ग, आध्यात्मिक जागृती, मानसिक व्यायाम, क्रीडा उपक्रम इत्यादींचा उपयोग केला जातो.
*🔆पात्रता आणि निवड प्रक्रियाः*
🔅धांगडधिंगा शिबीर हा १५ दिवसांचा कोर्स असून उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वर्षामध्ये एकदाच वयोगटासाठी ८ ते १२ वर्षांचा कालावधी असतो.
🔅मुलांची निवड शिबीर सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी सुरू होते. जवळपास 1000 अर्ज स्क्रिनिंग केले आहेत आणि जवळपास 150 मुलांची निवड नंदाईंनी केली आहे. शिबीरची फी अगदीच कमी आहे जेणेकरुन समाजातील सर्व स्तरातील मुले शिबीरचा फायदा घेऊ शकतात.
🔅शिबीरमध्ये विविध इनडोअर आणि मैदानी क्रिया, ब्रेन स्टॉर्मिंग सेशन्स, मेमरी आणि ऑडिओ व्हिज्युअल गेम्सचा समावेश आहे. त्यांच्या छंद वाढविण्यासाठी नंदाई एक दिवस खास समर्पित करतात.
🔅शिबीरच्या आध्यात्मिक घटकामध्ये मारुती स्तोत्र, राम रक्षा स्तोत्र या रोज जप केल्याचा समावेश आहे. या जपचा अभ्यास मुलांसमवेत नंदाईंनी केला आहे. शिबीर दरम्यान मुले स्तोत्रांच्या पठणांवर प्रेम करू लागतात आणि त्यानुसार त्यांच्या दैनंदिन कामात मग्न होतात. नंदताईंनी दिलेली बिनशर्त प्रेमामुळेच स्तोत्रांवर हे प्रेम ओढवले गेले आहे.
🔅नंदाईंचा ठाम विश्वास आहे की कठीण काळात, या स्तोत्रे मुलांना जीवनाच्या अशांत समुद्रामधून तारून नेण्यास मदत करतील.
*🔆मुलासाठी आहार:*
🔅नंदाई पौष्टिक आणि संतुलित आहाराच्या महत्त्वावर भर देतात. म्हणून शिबीर दरम्यान मुलांना पोषक आणि रुचकर पौष्टिक आहार दिले जाते.
*🔆खास काळजीः*
🔅 अपंग मुलांना देखील नंदाई लक्ष देतात. सर्व शिबीरमध्ये वैद्यकीय सुविधादेखील पुरविल्या जातात.
*विशेष लक्ष:*
🔅शिबीरचे खास आकर्षण म्हणजे चॉकलेटची हुंडी, ज्यात मुले मानवी पिरामिड बनवतात आणि हुंडी तोडतात. मुलीदेखील यात सहभागी होण्याची संधी गमावत नाहीत.
🔅या एक दिवसाच्या सहलीला नंदाई स्वतः सर्व मुलांसमवेत जातात.
*🌺हरिओम 🌺श्रीराम🌺 अंबज्ञ 🌺*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌🙌नाथसंविध्🙌🙌*
*🙌नाथसंविध्🙌*
साभार – WhatsApp