महाराष्ट्राला १३ पद्म पुरस्कार आनंद महिंद्रा यांना पद्म भूषण

नवी दिल्ली:- सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी श्री.जॉर्ज फर्नाडिस, श्री. अरूण जेटली, श्रीमती सुषमा स्वराज यांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्राला यावर्षी १३ पद्म पुरस्कार मिळाले आहेत.

दरवर्षी गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा होते. यावर्षी विविध क्षेत्राती ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १३ मान्यवरांना पद्म भूषण आणि ११८ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री.आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहेत. तर विविध क्षेत्रातील १२ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

श्री. सुरेश वाडकर – कला
श्री. पोपटराव पवार – सामाजिक कार्य
श्रीमती राहीबाई पोपेरे – इतर- कृषी
डॉ रमण गंगाखेडकर – विज्ञान व अभियांत्रिकी
श्री. करण जोहर – कला
श्रीमती एकता कपूर – कला
श्रीमती सरिता जोशी – कला
श्रीमती कंगना रानावत – कला
श्री.अदनान सामी – कला
श्री. झहिरखान बख्तीयारखान – क्रीडा
डॉ.सॅड्रा डिसुझा – वैद्यकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!