एअर इंडियाच्या २४२ प्रवाशी असणाऱ्या विमानाचा भीषण अपघात
अहमदाबाद:- दुपारी १.४० च्या सुमारास एअर इंडियाचे इंग्लंडला जाणारे विमान अहमदाबाद इथे कोसळले. विमान निवासी क्षेत्रात कोसळल्याने मोठया प्रमाणत जीवित आणि वित्तहानी झाली. भारतातील नेत्यांसह जगातील अनेक नेत्यांनी झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.
अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे AI-171 हे प्रवासी विमान उड्डान घेतल्यानंतर काही मिनिटांत विमानतळाजवळ कोसळले. सदर विमान इंग्लंडला जाणारे होते. २३२ प्रवाशांसह १० कर्मचारी विमानातून प्रवास करीत होते. विमानाचा अपघात वैद्यकीय महाविद्यालयाचा आवारात झाला. त्यामुळे तेथील काही विद्यार्थ्यांसह काही डॉक्टर जखमी झाल्याची प्राथमिक बातमी आहे.

विमानात १६९ भारतीय प्रवाश्यांसह ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज नागरिक व १ कॅनेडियन नागिरीकच समावेश होता. विमानातील दोन्ही वैमानिक भारतीय असून कॅप्टन सुमीर सभरवाल यांना ८ हजार २०० तासाचा अनुभव होता तर सह वैमानिकाला ११०० तसंच अनुभव होता. सदर दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचे अपघाती निधन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती दौपद्री मुर्मू, युनाइटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टारमर व सर्व राज्यातील मुख्यमंत्रांसह इतर अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.