बँक ऑफ इंडियाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यानी लाभ घ्यावा! -डॉ़ चांगदेव बागल

जानवली येथे किसानदिनानिमित्त शेतकरी मेळावा; ५३ लाखांच्या कर्जाचे वितरण

कणकवली:- शेतकरी हा देशातील प्रमुख घटक आहे़ केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना बँकांच्या सहकार्याने राबविल्या जात आहेत़.बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कृषी उपविभागीय अधिकारी डॉ़ चांगदेव बागल यांनी केले़. सिंधुदुर्ग जिल्ह्याची बँक ऑफ इंडिया ही मुख्य बँक असून किसान दिनाचे औचित्य साधून जानवली गावात शेतकरी मेळावा आयोजित केल्याबद्दल डॉ़ चांगदेव बागल बँक अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

जानवली ग्रामपंचायत सभागृह येथे बँक ऑफ इंडिया कणकवली व कृषी बँकींग केंद्र कणकवलीच्यावतीने शुक्रवारी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़. या कार्यक्रमासाठी सरपंच आर्या राणे, मुख्य प्रबंधक क्षेत्रीय कार्यालय कुडाळ प्रदीप प्रामाणिक, जिल्हा अग्रणी प्रबंधक अरूण कुमार, विस्तार अधिकारी आऱ मेस्त्री, कृषी अधिकारी श्री़ तोरणे, मुख्य प्रबंधक विश्वमित्र नाग, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक के. बी़ जाधव, ग्रामसेवक अर्चना लाड, ओरोस शाखा व्यवस्थापक श्री़ मालवणकर, तळेरे शाखा व्यवस्थापक श्री़ शाह, नांदगाव शाखा व्यवस्थापक श्री़ पांडे, सांगवे शाखा व्यवस्थापक श्री़ तडफदार, वैभववाडी शाखा व्यवस्थापक श्री़ कुंकडे यासह विविश बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी उपस्थित होते़.

सरपंच आर्या राणे म्हणाल्या, शेतकऱ्यांनी बँकांच्या सहकार्याने विविध फळ बागायती, फुल बागायती व अन्य प्रकारच्या शेती करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत़. बँक ऑफ इंडिया व अन्य बँका शेतकऱ्यांना आर्थिक समृध्द करण्याच्या दृष्टीने विविध योजना राबवित आहे़त. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेतल्यास निश्चितच प्रगती होईल़.

वरीष्ठ व्यवस्थापक के. बी़ जाधव म्हणाले, जिल्ह्याची लीड बँक बँक ऑफ इंडिया आहे़. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून बँक ऑफ इंडिया कार्यरत आहे़. त्यामुळे किसान दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना ५३ लाखांचे कर्ज वितरण करत आहोत़. त्यामध्ये कणकवली शाखा ३१ लाख, ओरोस शाखा १० लाख, मालवण शाखा ५.२० लाख, तळेरे शाखा ३.२० लाख, सांगवे शाखा ३.३० लाख, वैभववाडी शाखा २.३० लाख एकूण ५३ लाखांचे वितरण आम्ही करत आहोत़. शेतकऱ्यांनी पंतप्रधान सुकन्या समृध्दी योजना व शेती विषयक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले़.

या कार्यक्रमाचे सुत्र संचलन उत्तम अडळ यांनी केले़.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *