कोविडसंदर्भात राज्यात १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल

मुंबई:- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार १ लाख ८९ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३० हजार ८९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

  • अत्यावश्यक सेवेसाठी ६ लाख ०९ हजार ५४० पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत.
  • राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि. २२ मार्च ते १७ जुलै या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना – ३१४ (८७९ व्यक्ती ताब्यात)
  • १०० नंबरवर आलेले फोन – १ लाख ०७ हजार ४८६
  • राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन (Quarantine) असा शिक्का आहे, अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले.
  • अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे – १३४४
  • जप्त केलेली वाहने – १ लाख ०५ हजार १७६.
  • कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस – ८५
  • (मुंबईतील ४७ पोलीस व ३ अधिकारी असे एकूण ५०, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, नाशिक शहर १, एटीएस १, मुंबई रेल्वे ४, ठाणे शहर ५, ठाणे ग्रामीण २ पोलीस, १ अधिकारी, जळगाव ग्रामीण १,पालघर २, रायगड २, जालना एसआरपीएफ १ अधिकारी, जालना ग्रामीण १, अमरावती शहर १, उस्मानाबाद-१, नवी मुंबई एसआरपीएफ १ अधिकारी, औरंगाबाद शहर १, नवी मुंबई १)
  • कोरोना बाधित पोलीस – १६८ पोलीस अधिकारी व १२२४ पोलीस कर्मचारी

You cannot copy content of this page