लोकसभा निवडणूक- तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु, सकाळी ११ वा. पर्यंत १५ टक्के मतदान!

नवीदिल्ली:- आज १७ व्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानास सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून देशातील १३ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील ११७ लोकसभा मतदारसंघात सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांचाही समावेश आहे. आजच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील १८ कोटींहून अधिक मतदार आहेत. २३ मेला लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *