सत्तेवर कोण येणार? एक्झिट पोलच्या अंदाजाने भाजप आणि रालोआमध्ये उत्साह!

नवी दिल्ली:- जगातील सर्वात मोठ्या भारताच्या लोकशाहीतील मतदारांचा कौल आज स्पष्ट होणार आहे. सतराव्या लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांचे निकाल जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाची दिशा समजून येईल; परंतु अंतिम निकाल शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतील वेल्लूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाने रद्द केली आहे; कारण या ठिकाणी पैशाचा अमाप वापर झाल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे.

मतमोजणी पुर्व अंदाजामध्ये स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे संकेत मिळाल्याने भाजपा आणि रालोआमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *